आधुनिक तंत्रज्ञानाने गुन्ह्यांचा पद्धतशीर अभ्यास करून, पोलीस यंत्रणेची बुद्धी आणि असामान्य कर्तृत्व पणाला लावणार्या व.कृ. जोशी यांच्या शोधकथा!मृत्युपत्र असो की अपहरण, वासनेचा बळी, युनियनच्या भानगडी तर काहीवेळा आत्महत्येचा आभास निर्माण करत झालेल्या हत्या! निरनिराळ्या प्रकारांनी होणारे मृत्यू हा पोलिसांसमोरचा रोजचा प्रश्न आहे. पण आधुनिक वौज्ञानिक तंत्रांचा वापर करून झालेल्या हत्या हे पोलिसांसाठी एक आहानच ठरतं.पोलिसांच्या बुद्धी-कल्पकतेला आहान देणार्या अशाच गूढकथा...