‘देह झाला चंदनाचा’, ‘दिग्विजय’, ‘गीतांबरी’, ‘धनंजय’, ‘देवांच्या राज्यात’, ‘बिंदूसरोवर’ अशा विषयवैविध्यांनी युक्त कादंबऱ्यांचे रसिकमान्य लेखक राजेन्द्र खेर! त्यांनी 1989पासून लेखनाला प्रारंभ केला. विषयाचा सखोल अभ्यास, चित्रमय शैली, उत्कंठवर्धकता तसंच रंजकता ही त्यांच्या लेखनाची काही ठळक वैशिष्ट्यं आहेत. ‘स्वाध्याय प्रणेते’ पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या अलौकिक जीवनावरील ‘देह झाला चंदनाचा’ या राजेन्द्र खेर लिखित कादंबरीचा आतापर्यंत गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषांमधून अनुवाद झाला आहे. शिवाय त्यांच्या अन्य पुस्तकांचेही इंग्रजी अनुवाद प्रकाशित आहेत. राजेन्द्र खेर यांची जवळपास सर्व पुस्तकं ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.